'माळेगाव'च्या कामगारांचा आज सोमवारी काम बंद आंदोलनाचा इशारा

'माळेगाव'च्या कामगारांचा आज सोमवारी काम बंद आंदोलनाचा इशारा

 

बारामती :- तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या काही कामगारांना व अधिकाऱ्यांना संचालक मंडळाने दिलेल्या पगारवाढी विरोधात कामगारां मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.आम्हाला देखील पगारवाढ हवी, यासाठी कारखान्यातील कामगारांनी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना निवेदन देऊन याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास सोमवारी (दि.१७) काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

-----------<●●●>----------

  माळेगाव कारखाना प्रशासनाने कांही अधिकारी तसेच कामगारांना पगारवाढ दिली असल्याचे समोर येताच संबंधित पगारवाढ ही बेकायदेशीर असून,

नियमबाह्य असल्याचे मत कामगारांच्या एका गटाने व्यक्त करत या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

      याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही,तर आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन कर णार असल्याचे नमूद केले आहे. एकूणच माळेगाव कारखाना प्रशासनाने कांही अधिकारी आणि कामगारांना दिलेली पगारवाढ प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे संचालक मंडळ याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

-----------------------

कोणावरही अन्याय नको

माळेगाव साखर कारखाना प्रशासनाने काही ठरावीक कामगारांना व अधिकाऱ्यांना पगार वाढ केली आहे.परंतु कारखान्यातील अनेक कामगार या पगारवाढी पासून वंचित आहेत.त्यामुळे कामगारांच्या पद व श्रेणीनुसार पगारवाढ देण्यात यावी.यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे.

--------------------------

शेतकरी सभासदांना एफआरपीचे पैसे एकरकमी    सभासदांना पैसे एकरकमी न देता दोन टप्प्यांत दिले.असे असताना शेतकरी बांधवांना पैसे देण्यास प्रशासन हात आखडता घेत आहे.कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता काही कामगारांना व अधिका ऱ्यांना पगारवाढ दिली जात आहे. कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा.

🔸विलास सस्ते 

अध्यक्ष,बारामती तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना

-------------------------------

माळेगाव कारखान्याच्या कामगारांची हुद्देवारी

  कामगारांची हुद्देवारी व बढती मागील अनेक दिवसांपासून रखडलेली होती.तथापि सत्ता धारी संचालक मंडळाने अधि कारी आणि कामगारांना हुद्देवारी आणि बढती देऊन योग्य तो निर्णय घेतला आहे.अशावेळी दिलेली पगारवाढ ज्या कामगा रांना मान्य नसेल त्यांनी टोकाची भूमिका न घेता कारखाना प्रशास नाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा.

🔸राजेंद्र शिवाजीराव तावरे 

अध्यक्ष,बारामती तालुका साखर कामगार सभा